rahul soniya gandhi.jpg 
देश

काँग्रेसमध्ये फुटलेला 'लेटर बॉम्ब' काय आहे? वाचा राहुल, प्रियंका गांधींपुढील आव्हानं

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अनेक राज्यांमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसमध्ये एक लेटर बॉम्ब फुटला आहे. २० पेक्षा अधिक नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. या पत्रामध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात काही लिहिण्यात आलं नाही, असं पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एकाने सांगितलं.

काँग्रेसमधील एक गट राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं की, पक्षातील कार्यकर्ते आणि नेते राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवू पाहात आहेत. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी यापूर्वीच ही जबाबदारी घेण्यासाठी नकार दिला आहे. विशेष म्हणजे पक्षातील कोणताही मोठा निर्णय राहुल आणि प्रियंका यांच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नाही. सचिन पायलट यांच्या प्रकरणात हा प्रत्यय आला आहे.

काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पक्ष बंडखोरीच्या दिशेने जात आहे का, असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांच्या युवा टीममधील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. दुसरेकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा पक्ष नेतृत्वासाठी अडचणीचे ठरणारी वक्तव्यं केली आहेत.

काँग्रेसमध्ये गांधी परिवाराला विरोध सुरु झाला आहे का?

नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील संकटांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. यामुळे पक्षातील नेते अंतरिम अध्यक्षा आणि पक्ष चालवण्याच्या पद्धतीबाबत नाराज असल्याची शंका घेण्यास वाव आहे. पक्षातील कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी नेत्यांना गांधी परिवाराकडे जावे लागते.

काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली का? 

ही पहिली वेळ आहे, जेव्हा काँग्रेस नेत्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे सोनिया गांधी अध्यक्षपदावर असताना असं होत आहे. पक्षातील एक मोठा वर्ग राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये आपला नेता शोधत नाही. दुसरीकडे पक्षाचे अनेक नेते संपूर्ण बदलाची मागणी करत आहेत.

काँग्रेसमधील अनेक मोठे नेते पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत का? काँग्रेसमधील नेत्यांमध्ये अंसतोष वाढला आहे. काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या लेटर बॉम्बमुळे पक्षात अंतर्गत वाद असल्याचं समोर येत आहे.

सध्या 'कामचलाऊ' व्यवस्था!

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षा बनल्या. पुढच्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी अध्यक्षा असणार आहेत. त्यामुळे सध्या 'कामचलाऊ' व्यवस्था सुरु आहे. सोनिया गांधी आरोग्याच्या कारणास्तव सक्रिय नाहीत. दुसरीकडे कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे.
 
लेटर बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी CWC ची बैठक? 

लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. नेत्यांच्या पत्राला नाराजीच्या स्वरुपात पाहिलं जात आहे. त्यामुळे लेटर बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी काँग्रेस कार्यकारणीची बैठक  CWC बोलावले जाण्याची शक्यता आहे. सध्या गांधी परिवारासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

(edited by-kartik pujari)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT